Ashadhi Ekadashi Importance 2026आषाढी एकादशीचे महत्त्वा काय? कधी आहे आषाढी एकादशी ? जाणून घ्या एका क्लिकवर.

Ashadhi Ekadashi Importance 2026 : जून-जुलै महिन्यात महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना वेध लागतात ते आषाढी पंढरपूरच्या वारीचे (Ashadhi Ekadashi Importance 2026)  . अवघा महाराष्ट्र या आषाढ महिन्यात पांडूरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो. काही आठवडे दिवस-रात्र चालून हे वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशीपर्यंत पंढरपूरला पोहोचतात. अशा या आषढी एकादशीचे नक्की महत्त्व काय आहे ? यावर्षी कधी आहे आषाढी एकादशी हे आपण जाणून घेऊ.

आषाढी एकादशीचे महत्त्व :  (Ashadhi Ekadashi Importance 2026)

आषाढी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रादायाचा सर्वात मोठा सण समजला जातो. याच दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येेने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यांतील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला ‘देवशयनी आषाढी एकादशी’ असे म्हणतात.

यावर्षी कधी आहे आषाढी एकादशी ?  जाणून घ्या  (Ashadhi Ekadashi Importance 2026)

यावर्षी 2026 मध्ये आषाढी एकादशी शनिवार, 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. एकादशी तिथी 24 जुलै रोजी सकाळी 9:12 पासून सुरू होणार आहे तर 25 जुलै रोजी सकाळी 11:34 पर्यंत रहाणार आहे. ज्यांनी व्रत म्हणजे उपवास ठेवलेला आहे, ते सोडण्याची वेळ 26 जुलैला सकाळी 5:30 ते 8:30 च्या दरम्यान असणार आहे.

अध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

पंढरपूरवारीचे महत्त्व : (Ashadhi Ekadashi Importance 2026)

महाराष्ट्रात हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. महाराष्ट्रात घराघरातून या दिवशी उपवास केला जातो. जे वारकरी पायी वारी करत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले आहेत, ते विठ्ठलनामाचा गजर करत आषाढी एकादशीलाच पंढरपूरला पोहोचतात. म्हणून याला आषाढी वारी असेही म्हणतात. चंद्रभागेत स्नान करण्याचे महत्त्व या दिवशी आहे. पायी वारी करत पोहोचलेले वारकरी सर्वप्रथम चंद्रभागेत स्नान करून, मगच विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे रहातात. यादिवशी लाखोंनी भक्तमंडळी पंढरपूरात उपस्थितीत असतात, त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याला दर्शन मिळेलच असे नाही. मात्र वारकरी विठ्ठल जिथे वसला आहे, त्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनही समाधानी असतात.

कोणत्या पालख्या असताता पंढरपूरात ? (Ashadhi Ekadashi Importance 2026)

आळंदीची संत ज्ञानोबांची आणि देहूची संत तुकोबांची पालखी असते. याशिवाय शेगाव येथून संत गजानन महाराजांची, त्रंबकेश्ववराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगरयेथून मुक्ताबाई यांची पालखी प्रामुख्याने असतात. याशिवायही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पालख्या आलेल्या असतात.

आषाढी एकादशीविषयीची धार्मिक मान्यता (Ashadhi Ekadashi Importance 2026)

देवशयनी एकादशीबद्दल असे सांगितले जाते की, या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचे एक वर्ष हे देवांची एक रात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यांतील कर्क संक्रातीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरूवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी किंवा हरि शयनी एकादशी असे म्हणतात. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो.

एकादशीची तिथी कशी असते ? (Ashadhi Ekadashi Importance 2026)

हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात. त्यामुळे दोन तिथी असतात. एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी. म्हणून आषाढ महिन्यात एकादसी दोनदा येते. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादसी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.

यावर्षीही दरवर्षी प्रमाणे प्रशासन वारकऱ्यांसाठी सुविधांसह पंढरपूरात सज्ज आहे. असंख्य वारकरी, विठ्ठल भक्त, वारीचे अभ्यासक असे अनेकजण आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होणार आहेत. आणि विठ्ठलनामाच्या गजरात रममाण होणार आहेत. यासर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Our Newsletter

Subscribe to receive our latest blog posts directly in your inbox!