• Home
  • महाराष्ट्र
  • Bachchu Kadu Hunger Strike End Mahayuti Govt promises To farmers Loan Waiver Committee To be Formed : बच्चू कडूंचे 6 व्या दिवशी उपोषण सुटले, सरकारकडून आश्वासन पत्र
Bachchu Kadu

Bachchu Kadu Hunger Strike End Mahayuti Govt promises To farmers Loan Waiver Committee To be Formed : बच्चू कडूंचे 6 व्या दिवशी उपोषण सुटले, सरकारकडून आश्वासन पत्र

Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे नेते बच्चब कडू यांनी गेले सहा दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. आज सहाव्या दिवशी त्यांनी हे आंदोलन संपूष्टात आणले. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी त्यांना एक आश्वासन पत्र दिले आहे.

महाराष्ट्र : 2025-06-14

बच्चू कडू ( Bachchu Kadu )यांना सरकारकडून आश्वासन पत्र देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसात उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. उर्वरित मुद्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी आज आपलं उपोषण सोडलं. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले होते. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस सुरू झाला होता. मात्र आज सहा दिवस पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. 

सरकारचे आश्वासन 

  • शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.
  • समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार.
  • थकित कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात येईल.
  • दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद केली जाईल.

सरकारकडून या आश्वासनांचे पत्र कडू यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली आहे. बच्चूकडू यांनी सरकारला कर्जमाफीच्या निर्णयासंबंधी 2 ऑक्टोबर पर्यंत वेळ दिली आहे. बच्चू कडू यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी यावेळी चर्चा केली. सरकारने दिलेले आश्वासन पत्र वाचून दाखवले. सामंत यांनी कडूंना उपोषण सोडण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी फळांचा ज्यूस घेऊन आपले उपोषण सोडले. 

काय म्हणाले बच्चू कडू ? 

बच्चू कडू यावेळी म्हणाले की, मी आंदोलन स्थगित करत आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी 2 ऑक्टोबर ही डेडलाईन देत आहे. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, सरकारने 2 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा, नाहीतर त्यांना मंत्रायलात घुसावे लागेल. जर तुम्ही शेतकऱ्यांकडून बळजबरी कर्जवसूली केली, तर तुम्हाला झाडाला बांधून आम्ही मारू. आंदोलनस्थळी बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एकजूट झाला आहे. हेच आंदोलनाचे यश आहे. 8 दिवसांचा वेळ सरकारला देत आहोत, बळजबरीने वसूली करण थांबले पाहिजे. 

Leave a Reply

Releated Posts

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building In Pimple Saudagar

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At pune Airport Due To Leopard

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या…

ByByJyoti Bhalerao Nov 27, 2025

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove Pune Metro Routs

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र…

ByByJyoti Bhalerao Nov 27, 2025

Anjali Damania Vs Ajit Pawar, Big News : अजित पवारांच्या राजीनाम्याची अंजली दमानियांची मागणी, देवेंद्र फडणवीसांना दिला इशारा : Anjali Damania Demands Ajit Pawar Resignation Over Pune Land Scam Allegations

Anjali Damania Vs Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यातील गैरव्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा गंभीर…

ByByJyoti Bhalerao Nov 26, 2025

Leave a Reply

  • Home
  • महाराष्ट्र
  • Bachchu Kadu Hunger Strike End Mahayuti Govt promises To farmers Loan Waiver Committee To be Formed : बच्चू कडूंचे 6 व्या दिवशी उपोषण सुटले, सरकारकडून आश्वासन पत्र
Bachchu Kadu

Bachchu Kadu Hunger Strike End Mahayuti Govt promises To farmers Loan Waiver Committee To be Formed : बच्चू कडूंचे 6 व्या दिवशी उपोषण सुटले, सरकारकडून आश्वासन पत्र

Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे नेते बच्चब कडू यांनी गेले सहा दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. आज सहाव्या दिवशी त्यांनी हे आंदोलन संपूष्टात आणले. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी त्यांना एक आश्वासन पत्र दिले आहे.

महाराष्ट्र : 2025-06-14

बच्चू कडू ( Bachchu Kadu )यांना सरकारकडून आश्वासन पत्र देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसात उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. उर्वरित मुद्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी आज आपलं उपोषण सोडलं. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले होते. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस सुरू झाला होता. मात्र आज सहा दिवस पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. 

सरकारचे आश्वासन 

  • शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.
  • समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार.
  • थकित कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात येईल.
  • दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद केली जाईल.

सरकारकडून या आश्वासनांचे पत्र कडू यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली आहे. बच्चूकडू यांनी सरकारला कर्जमाफीच्या निर्णयासंबंधी 2 ऑक्टोबर पर्यंत वेळ दिली आहे. बच्चू कडू यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी यावेळी चर्चा केली. सरकारने दिलेले आश्वासन पत्र वाचून दाखवले. सामंत यांनी कडूंना उपोषण सोडण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी फळांचा ज्यूस घेऊन आपले उपोषण सोडले. 

काय म्हणाले बच्चू कडू ? 

बच्चू कडू यावेळी म्हणाले की, मी आंदोलन स्थगित करत आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी 2 ऑक्टोबर ही डेडलाईन देत आहे. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, सरकारने 2 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा, नाहीतर त्यांना मंत्रायलात घुसावे लागेल. जर तुम्ही शेतकऱ्यांकडून बळजबरी कर्जवसूली केली, तर तुम्हाला झाडाला बांधून आम्ही मारू. आंदोलनस्थळी बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एकजूट झाला आहे. हेच आंदोलनाचे यश आहे. 8 दिवसांचा वेळ सरकारला देत आहोत, बळजबरीने वसूली करण थांबले पाहिजे. 

Releated Posts

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building In Pimple Saudagar

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At pune Airport Due To Leopard

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या…

ByByJyoti Bhalerao Nov 27, 2025

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove Pune Metro Routs

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र…

ByByJyoti Bhalerao Nov 27, 2025

Anjali Damania Vs Ajit Pawar, Big News : अजित पवारांच्या राजीनाम्याची अंजली दमानियांची मागणी, देवेंद्र फडणवीसांना दिला इशारा : Anjali Damania Demands Ajit Pawar Resignation Over Pune Land Scam Allegations

Anjali Damania Vs Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यातील गैरव्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा गंभीर…

ByByJyoti Bhalerao Nov 26, 2025

Leave a Reply