Leopards Sterilization : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरूर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्दैवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना कऱण्यात येतील असे गणेश नाईक यांनी सांगितले आहे.
शिक्रापुर : 18/11/2025
मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्यासाठी प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी तसेच कृत्रिम बुद्धीमतेवर आधारित एआय तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच बिबट्या नसबंदीबाबत (Leopards Sterilization) केंद्राची मान्यता प्राप्त झाली असून त्याबाबतची कार्यवाही करावी आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.
पुणे येथील वनसंरक्षक यांच्या सभागृहात मानव बिबट संघर्ष उपाय योजनांबाबत आयोजिक बैठकीत बोलताना वनमंत्री गणेश नाईक बोलत होते. याप्रसंगी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, वनसंरक्षक पुणे वनवृत्त महादेव मोहिते. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, श्रीधर्मबीर सालचिठ्ठल, विवेक होशिंग, उपवनसंरक्षक जयराम गौडा, कुलराज सिंह, सिद्धेश सावडेकर, पंकज गर्ग यांसह आदी वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मानव बिबट्या संघर्षाबाबत नवकर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत अशून त्यांनी आवश्यक साहित्या पुरविण्यात यावे, जिल्हा योजनेतून आकस्मिक निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचा पाठपुरावा कऱण्यात येत असून बांबू लागवड करून बिबट्याला अटकाव करता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करावा असे सांगितले.
यावेळी साखर कारखान्यांनी करावायाची कार्यवाही, टायगर फाऊंडेशनवर आधारित नियोजन तसेच बिबट्यांची गणना करणे, बिबट्यांचे मायक्रोमॅपिंग, पोल्ट्री वेस्ट तसेच हॉटेल वेस्टची विल्हेवाट, रेस्क्यू सदस्यांचा विमा काढणे, बेस कॅम्पचे सक्षमीकरण करणे, कुरण विकास करून बिबट्यांकरीता अधिवास तयार करणे, मेंढपाळ, ऊस कामगार आदीकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा कऱण्यात आली, दरम्यान उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी मानव बिबट्या संघर्षाबाबत केलेल्या उपाय योजना सादरीकरण केले.
काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक ? (Leopards Sterilization)
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरूर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दिर्घ व तातडीच्या उपाययोजना कऱण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी कऱण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करूनन अलर्ट देण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक
Leave a Reply