Bihar Election Results : नुकताच बिहार निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपाला मिळालेले यश पाहून विरोधकांसह महाराष्ट्रातही सर्वांनाच धक्का बसल्याचे दिसून येत आहे. यातच आता महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून अभिनंदन केल्याचे समजते.
मुंबई : 15/11/2025
बिहार निवडणुकांचा (Bihar Election Results) निकाल जाहीर होताच भाजप मध्ये आनंदाचे वातावरण आहे. विरोधकांना मोठा झटका बसला असला तरी, भाजपप्रणीत इतर राज्यातील सत्त्याधाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. या बिहार निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांच्या महाआघाडीला मिळून 40 जागाही मिळाल्या नाहीत, तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान NDA च्या दणदणीत विजयानंतर कॉंग्रेसने पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून बिहारमधील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
एकनाथ शिंदेंचा पंतप्रधानांना फोन (Bihar Election Results)
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, बिहारमधी विजय हा मोदींच्या नेतृत्वाचाच परिणाम असल्याचे म्हटले आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून महायुती भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल करत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सर्व ठिकाणी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply