Translate :

Sponsored

Harshwardhan Sapkal, Shocking News 2026 : टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, हर्षवर्धन सपकाळ यांची टिपण्णी : Harshwardhan Sapkal Praise Tipu Sultan Compared With Shivaji Maharaj

टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, हर्षवर्धन सपकाळ यांची टिपण्णी

Harshwardhan Sapkal : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्यावर टिप्पणी केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदर्भ देत ही टिप्पणी केली आहे. त्यावर भाजपने टीका केली आहे.

मुंबई : 14-02-2026 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  (Harshwardhan Sapkal) यांनी टिपु सुलतान यांच्याविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत एक टिप्पणी केली आहे. टिपू सुलतान यांनी कधी विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान (Harshwardhan Sapkal)

हर्षवर्धन सपकाळ माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाचा विचार दिलेला आहे. याच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले.

शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे (Harshwardhan Sapkal)

तसेच, टिपू सुलतान हे भारताचे भूमीपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष म्हणून पाहिले पाहिजे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

भाजपची यावर काय भूमिका (Harshwardhan Sapkal)

हर्षवर्धन सपकाळ यांच्या याच विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. “खरं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी टिपू सुलतान यासारख्या नराधमाची तुलना यांनी शिवाजी महाराजांशी केली आहे. ही बाब अतिशय निंदनीय आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केलं. मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याते काम केले. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य तयार केले. त्याच वेळी हजारो-लाखो हिंदूंची टिपू सुलतान याने हत्या केली. टिपू सुलतानची शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणे, दोघांनाही समान सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगुलचालन मी या जन्मात पाहिले नाही”, अशी रोखठोक भूमिका फडणवीस यांनी घेतली . तसेच सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

दरम्यान, फडणवीस यांच्या टिकेला सपकाळ यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ” छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आरएसएसच्या भगससिंह कोश्यारी सह कुणी-कुणी काय-काय मुक्ताफळे उधळली आणि अवमान केलाय हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही,” असा पलटवार सपकाळ यांनी केला आहे. तसेच संविधानाच्या मूळ प्रतिवर शिवाजी महाराज व टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे, असा दाखलाही त्यांनी दिलाय.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored