Translate :

Sponsored

‘Abhi Na jao Chod Kar’ ..CM Devendra Fadanavis sang Song With Asha Bhosale: ‘अभी ना जाओ छोड कर’ … म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसलेंसह छेडले सूर !

CM Devendra Fadanavis : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील महाराष्ट्र रेडियो महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडियो गौरव पुरस्कार कार्यक्रमात भाग घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या अंदाजात ‘अभी ना जाओ छोड कर ‘ म्हणत काही ओळीसुद्धा गुणगुणल्या. 

मुंबई : 2025-06-21

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadanavis ) यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्र रेडियो महोत्सव आणि महारा्ष्टर आशा रेडियो गौरव पुरस्कार कार्यक्रमात ‘अभी ना जाओ छोडकर’ गाण्याच्या काही ओळी गुणगुणत वाहवा मिळवली. यावेळी त्यांच्यासमोर साक्षात गानसम्राज्ञी आशा भोसलेसुद्धा उपस्थित होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑडियो- व्हिज्युअल माध्यमाद्वारे व्यक्त होणे जास्त सोपे आहे, कारण त्यात आपण समक्ष दृश्यमान असतो. 

त्यांनी म्हटले की, रेडीयोची ची सर्वात जास्त चांगली बाब ही आहे की, यात चांगल्या प्रकारे व्यक्त होता येते. जेव्हा की यात कोणीही दृश्य स्वरूपात नसते. नव्या तंत्रज्ञानाच्या काळात आपल्याला आता 3D, 4D आणि 17 D अनुभव मिळत आहे, मात्र रेडियोच्या काळात फक्त 1D होते आणि संगीत होते तरीही त्याने आम्हाला व्यक्त होण्यासाठी आवाज दिला, आमच्या संस्कृतीला एक नवीन आकार दिला. 

मुख्यमंत्र्यांनी गुणगुणल्या गीताच्या ओळी

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महाराष्ट्र रेडियो कार्यक्रम आणि महाराष्ट्र आशा रेडियो गौरव पुरस्कार समारोपाच्या कार्यक्रमात ‘अभि ना जाओ छोड कर ‘ प्रसिद्ध हिंदी गाण्याच्या ओळी गुणगुणल्या. 

आळंदीत कत्तलखाने उघडण्यात येणार नाहीत : फडणवीस

वारकरी भक्ती योग कार्यक्रमा दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील आळंदीयेथील मंदिराच्या परिसरात कत्तलखाने उघडू देणार नाही. हा परिसर, जिथे संत ज्ञानेश्वरांचे मंदिर आहे, जीथून दरवर्षी पंढरपूरला वारी निघते. ते म्हणाले की, आळंदीच्या विकास योजनेमध्ये कत्तलखान्यांसाठी असणाऱ्या आरक्षित जागांना काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बांधावरील पाण्याच्या निर्वहनासाठी योग्य व्यवस्था कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत, ज्यामुळे पूरापासून संरक्षण मिळेल. आम्ही यावर्षी स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत की, धरणातून कधी पाणी सोडायचे आणि कधी नाही. त्यासाठी शेजारील राज्यांशी आमचे चांगला समन्वय आहे. पावसाळी दिवसांमध्ये आमचे इंजिनियर या राज्यांमध्ये तैनात केले आहेत.  

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored